सासवड, (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला उत्साहात साजरी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि. १२ ते १९ फेब्रुवारी या काळात महाराष्ट्रभर राज्य स्वराज्य सप्ताहाचे आयोजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अमित झेंडे यांनी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथील शिवतीर्थावर पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे व संयोजक रफिक तांबोळी, बप्पा सावंत यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रवादीच्या सर्व शाखांमधून शिवरायांचा इतिहास पुन्हा समाजापुढे आणला जाणार आहे. येणाऱ्या पिढीला महाराजांची ध्येय, शौर्य, पराक्रम, आदर्श राज्यकारभाराची माहिती व स्वराज्य सप्ताहाचे राज्यभर आयोजन करण्यात येणार असल्याचे पुरंदर हवेलीचे अध्यक्ष वामन जगताप यांनी सांगितले.
रायगड येथे स्वराज्य सप्ताहाचा समारोप झाल्याचे संयोजक रफिक तांबोळी यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर बागमार, भटक्या विमुक्त सेलचे अध्यक्ष राहुल गायकवाड, रामभाऊ बोरकर, संदीप चिकणे, भाऊसाहेब कामठे, नवनाथ बोरावके, अंकुश खेडेकर, प्रकाश काटकर, महिला अध्यक्षा वंदना जगताप, माई सस्ते, मनीष रणपिसे, रमेश ढोरे, उमेश जगताप उपस्थित होते.