नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. एनडीए सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर आज तिसऱ्या दिवशी लोकसभेत चर्चा सुरू होती.विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर मोदी उत्तर देत होते यावेळी त्यांनी काँग्रेसच्या सुरुवातीपासूनच्या काळाचे वर्णन देखील केले.
हे इंडिया गटबंधन नसून घमंडीया गटबंधन आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. विरोधकांनी इंडियाचे (I N D I A ) तुकडे केले असं देखील पंतप्रधान यावेळी म्हणाले. पंतप्रधान यावेळी काँग्रेसवर बोलत राहिले. पंतप्रधानांनी थेटपणे विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे न दिल्याने विरोधकांनी सभागृहात मणिपूरच्या नावाने घोषणाबाजी सुरु केली.
वी वॉन्ट मणिपूर.. इंडिया.. इंडिया .. इंडिया अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी विरोधकांकडून करण्यात आली. मोदी म्हणाले, नो कॉन्फिडन्स मोशनसाठी फिल्डिंग विरोधकांनी लावली. मात्र चौकार-षटकार इकडून (सरकारच्या बाजूने) मारले गेले. अविश्वास प्रस्तावावर विरोधक नो-बॉल-नो-बॉल करत होते आणि आमच्याकडून सेंच्युरी झळकावली जात आहेत.
काँग्रेसच्या घराणेशाहीची अनेकांचे अधिकार हिरावून घेतले. काँग्रेसला केवळ घराणेशाही आवडते. त्यांच्या परिवाराव्यतिरिक्त दुसरा कोणी पंतप्रधान झालेलं काँग्रेसला आवडत नाही अशी टीका देखील मोदींनी यावेळी केली.