वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी आमच्या अगोदरच्या पिढीने खूप संघर्ष केला. आम्हीही शिकून प्रगती करून आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावावा, या विचाराने आम्ही शिक्षणाकडे वळलो, असे भावोद्गार माजी विद्यार्थी दशरथ बाळा चव्हाण यांनी काढले.
चव्हाण हे वेनवडी शाळेतील १९४८ मधील पहिलीच्या बॅचचे विद्यार्थी आहेत. वेनवडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अमृतमहोत्सव सोहळयाचे आयोजन ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले.शाळेची इमारत फुलांनी सजवून, सडा रांगोळी काढली. माजी विद्यार्थी दशरथ चव्हाण यांचा सत्कार सध्या इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्यानिमित्त गावातून १९४८ आणि १९४९ मध्ये इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ढोल लेझिमीच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत गावातून मिरवणूक काढण्यात आली. या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केल्यानंतर आपल्या वर्गाचे पूजन दशरथ बाळा चव्हाण यांच्या हस्ते केले. त्यांच्या नंतर माजी विद्यार्थ्यांनी वर्गात जात गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. या समयी ८२ ते ८५ वर्ष वयोगटातील विद्यार्थी भावूक झालेले पहावयास मिळाले. १९४९ किसन चव्हाण, किसन नेवसे,विठठल शिंदे, दिनकर शिंदे यांनी सद्यस्थितीत पहिलीत शिकत असलेल्या आपल्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम चव्हाण, समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, माजी प.स सदस्य सतिष चव्हाण, माजी सरपंच रुपेश नेवसे, सरपंच हनुमंत मळेकर, उपसरपंच विदया चव्हाण सुनिता चव्हाण,नरेश चव्हाण,संजिवनी लोखंडे, तंटामुक्ती अध्यक्ष आनिल चव्हाण, स्वाती चव्हाण, बाळासो चव्हाण, मुख्याध्यापिका भारती गायकवाड,रेश्मा घोलप,अमृत पडोळे, साळुंके, बेलसरे, बलकवडे ग्रामस्थ माउ विदयार्थी उपस्थित होते.सुञसंचालन नरेश चव्हाण यांनी केले. मुख्याध्यापिका भारती गायकवाड यांनी केले. रेश्मा घोलप यांनी आभार मानले
७५ वर्षांनी एकत्र आले विद्यार्थी
१९४८ व २०२४ सालातील पहिली वर्ग एकञ आले होते. ७५ वर्षे शाळेला पूर्ण झाली, त्या निमित्ताने वर्ग भरला होता. फेब्रुवारी १९४८ मध्ये वेनवडी प्राथमिक शाळेची स्थापना झाली. पहिल्या वर्षी ३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. गावातील ७० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील जेष्ठांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शाळेच्या शिक्षकांना मानपत्र, ट्राफी,शाल,श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.