लोकांना काय आवडतं याचा विचार आम्ही करत नाही. आम्हाला जे मनापासून आवडतं तेच आम्ही करतो, असे विधान मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी केले आहे. या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठीतील प्रसिद्ध संगीतकार जोडीने आपले अनुभव सांगितले. “आम्ही लोकांना काय आवडतं याचा विचार करत नाही, तर आम्हाला जे मनापासून आवडतं तेच आम्ही करतो. कारण, जे आपण मनापासून करतो ते सर्वांनाच आवडतं असा आमचा अनुभव आहे. जोपर्यंत एखादी गोष्टी आम्हाला मनापासून आवडत नाही. जोपर्यंत आमच्या स्वतःसाठी वाह निघत तोपर्यंत आम्ही काम करतो, असेही त्यांनी सांगितले. कारण, खूप विचार करुन एखादी गोष्टी केली तर त्यात उत्स्फुर्तता राहत नसल्याचे अजय-अतुल म्हणाले.
दरम्यान, फोर्ब्स इंडियाने 100 सेलिब्रीटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलची जोडीला या यादीत स्थान मिळाले आहे. ही जोडी 22 व्या क्रमांकावर आहे. कमाई आणि लोकप्रियतेच्या जोरावर अजय-अतुलच्या जोडीने हे स्थान मिळवले आहे.