मुंबई : राज्यात आज सकाळपासूनच राजकारणाने एक वेगळे वळण घेतले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांची एकत्र पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भाजपवरदेखील टीका केली आहे.
NCP Chief Sharad Pawar: Ajit Pawar’s decision is against the party line and is indiscipline . No NCP leader or worker is in favour of an NCP-BJP government pic.twitter.com/1AiEL4IUfC
— ANI (@ANI) November 23, 2019
शिवसेना जे काही करते ते उघडपणे करते. आम्ही दिवसाढवळया राजकारण करतो. आमच्याकडे रात्रीस खेळ चालेचे राजकारण चालत नाही अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावर टीका केली. हा केंद्राने महाराष्ट्रावर केलेला सर्जिकल स्ट्राइक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र राहील आणि आम्ही पुढची दिशा ठरवू असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आधी ईव्हीएमचा खेळ सुरु होता. आता नवीन खेळ चालू आहे. आता निवडणुकीची गरज उरली आहे असे मला वाटत नाही. विश्वासघात झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले हे सर्वांना ठाऊक आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपाच्या मी पणा विरुद्ध ही लढाई आहे. पाठित खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करु नका. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करावा तसा हा महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राइक आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.