नगर -गेल्या 30 वर्षापासून कल्याणरोड परिसरातमोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे. मात्र, आजतागयत या भागाचा पाणीप्रश्न सुटला नसून, विद्या कॉळनी, संभाजी नगर, समतानगर, अनुसायानगर परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून टॅकर सुरु राहण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कृत्रिम पाणी टंचाई केली जात आहे. मोफत पाणी असतानाही सर्व टॅकर चालक नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात पैशाची मागणी करत असल्याचा आरोप ही येथील नागरिकांनी केला आहे.
पाणी प्रश्नाबाबत नागरिकांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे, तसेच स्थानिक नगरसेवकांकडे निवेदन दिली. मात्र, याचा काही एक उपयोग झाला नाही. आजही या परिसरात 10-12 दिवसांनी पाणी सोडले जाते. तेही कमी दाबानी. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टॅकर वाल्यांना, पाणी सोडण्याऱ्यांना तसेच नगरसेवकांना पाण्यासाठी वारंवार फोन लावावे लागते. तरीही नागरिकांना पुरेसे पाणी दिले जात नाही. आजही सणासुदीच्या काळामध्ये पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
कल्याणरोड परिसरामध्ये पाण्याचे लाइन टाकले असतानाही कमी दाबाने पाणी का? दिले जाते. टॅकर सुरु राहण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कृत्रिम पाणी टंचाई केली जात नाही ना? महापालिका कल्याणरोड परिसरातील टॅकरवर लाखो रुपये खर्च करूनही नागरिकांना पाणी का मिळत नाही. मोफत पाणी असतानाही टॅंकर चालक नागरिकांकडून पैशाची मागणी करत असतात.
जो पैसे देईल, त्यालाच आधी पाणी दिले जाते. या भागातील ठराविक लोकांनाच पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांना पाणीपट्टीबरोबरच टॅकरचेही पैसे मोजावे लागत आहेत. असा आरोप नागरिकामधून होत आहे.