वाल्हे: कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाल्हे गाव तसेच गावाजवळील १२ वाड्या -वस्ती शनिवार दि.१८ ,तसेच रविवार दि.१९ एप्रिल असे दोन दिवस पुर्ण बंद राहाणार आहे.
यापूर्वीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून वाल्हे गाव तसेच परिसरामधील वाड्या – वस्ती १२ एप्रिल ते १४ एप्रिल असे तीन दिवस पुर्ण बंद ठेवण्यात आले होते. यावेळीही सर्वच ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत स्थानिक प्रशासनाने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला होता. तसाच प्रतिसाद या दोन दिवसामध्येही ग्रामस्थांनी द्यावा असे आव्हान, पुणे जिल्हा बॅकेच माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी केले आहे.
ग्रामपंचायतीत झालेल्या यापूर्वीच्यांच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता असे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले. वाल्हे (ता.पुरंदर) गावामध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दि.१८ एप्रिल ते १९ एप्रिल पर्यंत १०० टक्के गाव बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले.
बंदच्या काळात गावातील सरकारी व खासगी दवाखाने, मेडिकल्स, वगळून सर्व दुकाने १०० टक्के दुकाने बंद असणार आहेत. स्वत धान्यं दुकाने माञ या वेळी सुरू राहतील असे स्थानिक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या व सामाजिक आरोग्यास बाधा पोहोचविणाऱ्या व्यक्तीवर संचारबंदी व जमावबंदी कायद्यानुसार व नोटीसाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल
ग्रामस्थांनी संचारबंदीबाबत कडक सूचना देऊन नियम मोडणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे वाल्हे पोलिस ठाण्यातील हवालदार हनुमंत गार्डी यांनी सांगितले.