बारामती (प्रतिनिधी) : येथील सागरदादा देवकाते मित्र मंडळाच्या वतीने निरावागज येथील चारशे गरजूंना अन्नधान्य, मास्कचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत योग्य खबरदारी घेत मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. बारामती शहरात कोरोनाची संख्या वाढल्याने भीलवाडा तसेच बारामती पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्यानुसार बारामती शहर व तालुका सील करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत. शहरी भागात मदतीचा ओघ सुरू आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागातही निराधार व गरजू व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना मदतीची गरज आहे हे ओळखून निरावागज येथील गरजू व निराधार व्यक्तींना सागरदादा देवकाते मित्रमंडळाने मदतीचा हात दिला. प्रशासनाने सुरक्षिततेबाबतच्या दिलेल्या आदेशांचे पालन करत निरावागज येथील ग्रामपंचायतीसमोर गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी चारशेहून अधिक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळाली. सागर दादा देवकाते मित्रमंडळाचे नागरिकांनी कौतुक केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते ,ज्येष्ठ नेते संपतराव देवकाते, माळेगावचे संचालक मदनराव देवकाते तसेच सोमनाथ भोसले ,राजाभाऊ देवकाते ,दत्तात्रय भोसले, सरपंच स्वप्नाली भोसले ,विलासराव देवकाते संजय देवकाते, मालेगावचे डिसलरी चेअरमन अविनाश देवकाते ,रतन भोसले, राजू भोसले ,बाळासाहेब देवकाते ,कृषी अधिकारी शंकरराव देवकाते ,सुनील देवकाते , सामजिक कार्यकर्ते माजी सरपंच गणपतराव देवकाते, उत्तमराव देवकाते , सुरेश निकाळजे, पोलीस मित्र बाबू कारंडे व ग्रामस्थ उपस्थित होते .जंतुसंसर्ग रोग होऊ नये म्हणून सुरक्षित अंतर ठेवून कार्यक्रम पार पडला. गुलाबराव आप्पा देवकाते यांनी मार्गदर्शन केले .आभार सागर देवकाते यांनी मानले.