वाई -जालना येथे मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी वाईच्या मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पाचवडपर्यंत काढण्यात आलेला पायी मोर्चा मोठ्या शांततेत व लोकांच्या मोठ्या प्रतिसादात पार पडला. वाई ते सातारा असा काढण्यात येणारा हा मोर्चा पाचवड येथे अडवण्यात आला. तेथेच निवेदन देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
मराठा समाजातील तरुण- तरुणींनी श्री रायरेश्वर येथून वाई गणपती घाटावर पहाटे ज्योत आणली. त्यानंतर श्री महागणपतीचे दर्शन व आरती करुन या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा वाई शहरातून बावधन नाका- चतुर्थी हॉटेल- आसले मार्गाने पाचवड येथे दाखल झाला. महामार्गाकडे जात असलेला मोर्चा पाचवड येथे प्रशासनाने अडवल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी मोर्चाचे संयोजक व प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर हे तणावाचे वातावरण निवळले. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सुप्रसिद्ध विधीज्ञ ऍड. उमेश सणस, नितीन कदम, अनिल सावंत, काशिनाथ शेलार, विलास देशमुख, अशोक गायकवाड यांनी मोर्चाला व जमलेल्या सर्वांना मराठा क्रांती मोर्चाची भूमिका व वस्तुस्थिती विषद केली.
मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्ता व तरुणांच्या हस्ते अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले. आपल्या निवेदनातील सर्व मुद्दे शासनापर्यंत पोहोचवले जातील, असे जीवन गलांडे यांनी मोर्चाला संबोधित केले. जिल्ह्याला शोभेल असा सनदशीर मार्गाने व शांततेत मोर्चा काढल्याबद्दल बापू बांगर यांनी सर्व मोर्चेकरांचे आभार मानले. यावेळी नितीन पाटील, विजयाताई भोसले, प्रमोद शिंदे, दिलीप बाबर, शांतीलाल पवार, प्रतापराव पवार, मदन माधव भोसले, जयवंत पवार, विराज शिंदे, आनंदराव गायकवाड, विकास शिंदे, गजानन भोसले, स्वप्निल गायकवाड,शरद काटकर तसेच विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
वाई- पाचवड रस्त्यावर मोर्चाचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. तसेच तरुणांना अल्पोपहार, फळे व पाण्याच्या बाटल्या देण्यात आला. यामध्ये वाई शहर मुस्लिम समाजाच्यावतीने सहभाग घेऊन मोर्चाला पाठिंबा देण्यात आला. मोर्चा यशस्वी करण्यासाठी नितीन कदम, काशिनाथ शेलार, अनिल सावंत, भारत दादा खामकर, चरण गायकवाड, अजय मांढरे, भैया डोंगरे, किशोर भोसले, अक्षय निंबाळकर, प्रवीण भुसारी, संदीप गायकवाड, नाना पिसाळ, विक्रम वाघ, प्रथमेश सुर्वे, युगल घाडगे, डॉ. संतोष मांढरे, सचिन शिंदे, किरण खामकर, प्रमोद अनपट, अमर गायकवाड, नारायण नलावडे, विजय ढेकाणे, लालू शिंगटे, शशिकांत पवार, प्रदीप कदम, नितीन जगताप, प्रदीप जायगुडे, कुमार जगताप, निखिल भुसारी, बाळासाहेब चिरगुटे, ऍड. रवींद्र भोसले, स्वप्नील भिलारे, गोविंद इथापे, सचिन मानकुमरे, सौ. रुपाली कदम, सौ. रुपाली शिंदे, श्रीमती सारिका गवते, सुनंदा कट्टे, मीना मगर, सौ. निर्मला जाधव, स्वप्ना जाधव, सोनम जाधव,
आर्या जाधव, रेश्मा तुपे, सुवर्णा शिंगटे, सुरेखा सावंत आदी तसेच मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिक, तरुण-तरुणी, महिला यांनी विशेष प्रयत्न केले. मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईचे उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, फलटणचे उपअधीक्षक धस, परिविक्षाधिन सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण, सुधीर वाळुंज, कृष्णा पवार, भंडारे यांनी 100 कर्मचाऱ्यांच्या साहय्याने पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.