नवी दिल्ली : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यात विषारी वायूची गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडोजण आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.
#UPDATE 3 persons, including one child, dead after chemical gas leakage at LG Polymers industry in RR Venkatapuram village, Visakhapatnam: District Medical & Health Officer (DMHO). #AndhraPradesh https://t.co/sEx1YdgeOZ
— ANI (@ANI) May 7, 2020
वेंकटपुरम गावातील एलजी पॉलिमर उद्योग समूहात रासायनिक गॅसची गळती झाली. या गॅस गळतीमुळे कंपनीच्या आजूबाजूच्या तीन किलोमीटर परिसरातील लोकांना याचा त्रास जाणवू लागला. डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लोकांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी वी विनय चंद हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांनी सांगितले की, काहीजणांना श्वसनास त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन दिला जात आहे.
या दुर्घटनेमुळे बेशुद्ध पडलेले तसेच श्वसनास त्रास होऊ लागलेल्या शेकडो जणांना शहरातली किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलं व वृद्धांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. तसेच, दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Spoke to officials of MHA(Ministry of Home Affairs) and NDMA (National Disaster Management Authority) regarding situation in Visakhapatnam, which is being monitored closely. I pray for everyone’s safety and well-being in Visakhapatnam: Prime Minister Narendra Modi. #VizagGasLeak pic.twitter.com/kQkjCDA8ve
— ANI (@ANI) May 7, 2020
पंतप्रधान मोदींनी घटेनेबद्दल ट्विट केलं आहे. घटनास्थळाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले असून, गृहमंत्राल व एनडीएमआयशी (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) याबाबत बोलणं झालं असल्याचंही ते म्हणाले. मी विशाखापट्टणममधील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी व कल्याणार्थ प्रार्थना करतो, ”असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींनी एडीएमएबरोबर बैठक बोलावली आहे. तसेच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी देखील पंतप्रधान मोदींनी दुर्घनटेनेच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली असून केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.