नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी हे चांगलेच चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात ते ट्रकची स्वारी करताना दिसत आहेत. राहुल गांधी दिल्लीहून शिमल्याला रवाना झाले. वाटेत अंबाला ते चंदिगड असा ट्रकने प्रवास केला. त्यांच्या याच प्रवासाचा व्हिडीओ काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्यांच्या सोशल माध्यमांवर शेअर केला आहे.
राहुल यांनी अंबाला येथे ट्रक चालकांची भेट घेत त्यांनी वाहनचालकांच्या समस्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सोमवारी रात्रीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांनी राहुल यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेर करत त्यांनी ,”राहुल गांधी विद्यापीठातील विद्यार्थी, खेळाडू, नागरी सेवेची तयारी करणारे तरुण, शेतकरी, डिलिव्हरी पार्टनर, बसमधील सामान्य नागरिक आणि आता मध्यरात्री ट्रकचालकांना का भेटत आहेत? कारण त्याला या देशातील लोकांचे ऐकायचे आहे, त्यांची आव्हाने आणि समस्या समजून घ्यायच्या आहेत. त्यांना हे करताना पाहून एक विश्वास दिसून येतो, कोणीतरी आहे जो लोकांच्या पाठीशी उभा आहे, कोणीतरी आहे जो त्यांच्या उद्याच्या चांगल्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहे. कोणीतरी आहे जो द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडत आहे. आणि हळुहळू हे लक्षात येत आहे की या देशाला प्रेम आणि शांततेच्या मार्गावर परतायचे आहे, हळूहळू हा देश राहुल गांधींच्या बरोबरीने वाटचाल करू लागला आहे”, असे म्हटले आहे.
यूनिवर्सिटी के छात्रों से
खिलाड़ियों से
सिविल सर्विस की तैयारी कर रहे युवाओं से
किसानों से
डिलीवरी पार्टनरों से
बस में आम नागरिकों से
और अब आधी रात को ट्रक के ड्राइवर से
आख़िर क्यों मुलाक़ात कर रहे हैं राहुल गांधी?
क्योंकि वो इस देश लोगों की बात सुनना चाहते हैं,… pic.twitter.com/HBxavsUv4f
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) May 23, 2023
दरम्यान, या अगोदर राहुल गांधी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. पंतप्रधानांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करू नये, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे. नवीन संसद भवनाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. वीर सावरकर यांच्या जयंतीदिनी 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन करणार आहेत.
यापूर्वी राहुल गांधींनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली होती. हा प्रवास कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झाला. ही यात्रा १२ राज्यांतून गेली आणि जानेवारीत जम्मू-काश्मीरमध्ये संपली. 136 दिवसांच्या या प्रवासात राहुलने 4000 किलोमीटरहून अधिक अंतर पार केले होते.