नवी दिल्ली – कोणतेही आरोप करणे आणि त्यावर पत्रव्यवहार करणे हे खूप सोपे आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी खटल्यांच्या यादीवरील वादावर नाराजी व्यक्त केली.
मनी लाँड्रिंग प्रकरणी आप नेते सत्येंद्र कुमार जैन यांच्या जामीन याचिकेसंदर्भात ज्येष्ठ वकिल दुष्यंत दवे आणि प्रशांत भूषण यांनी त्यांना स्वतंत्र पत्रे लिहून यादीतील काही घडामोडींबद्दल उल्लेख केला होता. या
वर सरन्यायाधीश म्हणाले की, न्या. ए एस बोपण्णा आजारपणामुळे अनुपलब्ध असल्याने मनी लॉंड्रींग प्रकरणी आपचे नेते सत्येंद्र कुमार जैन यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी न्या. बेला एम. त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवण्यात आली, असे त्यांनी सुनावले.
तसेच या याचिकेची सुनावणी पुढे ढकलण्यासाठी ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी केलेल्या विनंती फेटाळून लावत यावर संबंधित न्यायाधीशच निर्णय घेतील, असेही नमूद केले.
वैद्यकीय कारणांमुळे न्या. बोपण्णा हे दिवाळीनंतर पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले नाहीत. म्हणून हे प्रकरण न्या. त्रिवेदी यांच्याकडे सोपवण्यात आली होती, ज्यांनी या प्रकरणाची अखेरची सुनावणी केली होती. यासंदर्भात बारच्या सदस्याने मला हा विशिष्ट न्यायाधीश हवा आहे, असे म्हणणे विचित्र असल्याचेही सरन्यायाधीशंनी म्हटले.