नवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. करोना काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 9 वाजता आपल्या टीमसोबत अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी रवाना झाल्या आहे.
देश को मजबूत आर्थिक नीतियों की आवश्यकता है, जुमला नीतियों की नहीं।
देश बजट में मजबूत आर्थिक नीतियां चाहता है।#JantaKiBaat pic.twitter.com/UywRY2lupy
— Congress (@INCIndia) February 1, 2022
यावर आता काँग्रेसने ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. देशाला मजबूत आर्थिक धोरणांची गरज आहे. जुमलेबाज धोरणांची नाही, असं ट्विट काँग्रेसने केलं आहे. तसेच या सोबत जन की बात हा हॅशटॅगही वापरला आहे. दरम्यान, बजेटच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामण आणि अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी बजेट सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी अर्थ मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते.
दरम्यान, वित्त मंत्रालयाच्या महासंचालकांनी दिलेल्या (मीडिया आणि कम्युनिकेशन्स) माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील.