दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी अविश्वसनीय आहे. अनेक खेळाडूंनी पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आणि टोकियोत यश मिळवले.
आता आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना केंद्रीय क्रीडामंत्रालय आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
टोकियोत पदकविजेत्यांच्या कामगिरीमुळे नवोदित खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल व जास्तीत जास्त खेळाडू ऑलिम्पिकला पात्र होतील. यंदाच्या स्पर्धेतील यशामुळे पॅरिसमध्येही भारतीय खेळाडू पदके मिळवतील आणि पदकांची संख्याही वाढवतील, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला.
करोनाच्या सावटातही भारतीय खेळाडूंनी अविश्वसनीय यश मिळवले याचा अभिमान आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सात पदके मिळवली. आता यानंतरच्या प्रत्येक स्पर्धेत पदकांची संख्या वाढलेली दिसावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.