मुंबई : राज्यात शिंदे-भाजप सरकार सत्तेत येऊन एक वर्ष उलटले असून त्यात मंत्रिमंडळ विस्तार नाही. त्यामुळे वर्षभरापासून मंत्रिपदासाठी असलेली प्रतीक्षा सर्वच शिंदे गटातील आमदार करत होते. त्यातच अजित पवार गटाच्या नऊ जणांचा अचानक मंत्रिमंडळ समावेश झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांमधील अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे. याच मुद्द्यावरून दोन आमदारांत शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे.
वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. त्यातच आमदारामधील भांडणाचे समजताच नागपूर दौरा सोडून मुख्यमंत्री मुंबईत दाखल झाले. त्यावेळी बंगल्यावर आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न मध्यरात्रीपर्यंत सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे अस्वस्थ झालेल्या शिंदे आमदारांनी सोमवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्यानंतर सोमवारी सायंकाळी शिवाजी पार्क पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर या विस्तारात स्थानसाठी शिंदे गटातील 6 झाली. आमदारात चुरस सुरू असून दोन आमदार एकमेकांना मिडल्याचे समजते. दरम्यान, प संख्या वाढवण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदाराना दिल्याचेही म्हटले जात आहे.
पवार यांच्यासह नऊ जणाच्या मंत्रिमंडळ समावेशाने शिंदे गटात कमालीची नाराजी आहे. महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी आशा असल्याने शिंदे गट आणि भाजपमधील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, अचानक समेत तिसरा वाटेकरी आल्याने त्यांच्या अपेक्षांना सुरूंग लागला. नव्या सत्ता समीकरणानुसार शिंदे गटाच्या आणखी जेमतेम तीन चार मंत्रिपदे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आपली वर्णी लागावी यासाठी शिंदे गटातील आमदारातच सुरस निर्माण झाली आहे. काही आमदारांनी वर्षभर ज्यांना मंत्रिपद उपभोगता आले त्यांना हटवून इतरांना संधी द्या’ अशी जाहीर मागणी केली आहे.