Uddhav Thackeray on BharatRatna। मुंबईत ठाकरे गटाच्या स्थानिय लोकाधिकार समिती अधिवेशन सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी राज्यातील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारवर देखील टीका केली. यासोबतच त्यांनी केंद्र सरकारच्या भारतरत्न देण्याला राजकीय खेळी असल्याचे म्हटले.
“जिवंत असताना त्यांना विरोध तुम्ही केला” Uddhav Thackeray on BharatRatna।
भारतरत्न पुरस्कारावरून उद्धव ठाकरे यांनी, ‘मोदींना हवं त्यांना भारतरत्न देत आहेत. ज्यांचा जिवंत असताना विरोध तुम्ही केला, जसे की करपुरी ठाकूर, त्यांना जनसंघाने विरोध केला होता, तेव्हा तुम्ही देखील त्यांना विरोध केला. आता बिहारध्ये मत हवे म्हणून त्यांना भारतरत्न देत आहात, तसेच आम्ही तेव्हा मागणी केली होती.
“एम.एस. स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावे, जर भारतरत्न देत आहात तर त्यांनी दिलेला अहवाल देखील लागू करावा, हा पोकळपणा आहे, येत्या काळात आणखीन काही भारतरत्न जाहीर करतील, भाजपला वाटत आहे की, एक अख्खा प्रदेश आपल्या बाजूने येईल, पण आता असे राहिले नाही.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
मोदी सरकारला मत देणार का?’Uddhav Thackeray on BharatRatna।
उद्धव ठाकरे यांनी, भाजपला 1300 कोटी मिळाले आहेत. भाडोत्री लोक खूप आहेत, भाडे मिळाले की काहीही मिळते. आजकाल फोन येतो, मोदी सरकारला मत देणार का? पण मोदी सरकार जो खर्च करतायत तो पैसा भारत सरकारचा नाही का? एका शेतकऱ्याने सांगितले आहे, की मी कुटुंबासह आत्महत्या करेन पण मोदींना मत देणार नाही.