मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. ‘राज्यात कोरोना व्हायरससारखं महाभयंकर संकट असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं निवास्थान असलेल्या मातोश्रीबाहेर पडत नाही,’ अशी टीका करत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
“माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही,”
“काही अपवाद वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत, त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील,” अशी खोचक टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
“कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत,” असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
कोरोना संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर यांनी ही वक्तव्य केली आहेत.
दरम्यान, पुण्यात टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीमधील पाडुरंग रायकर या पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याबाबत बोलताना दरेकर यांनी, “एक होतकरू पत्रकार आज दुर्दैवाने मृत्युमुखी पडला आहे आणि आता त्यांचे निधन झाल्यानंतर चौकशी करून काय उपयोग? त्यातून काय साध्य होणार? पुण्याला मुख्यमंत्री येऊन गेले. तेथे कोविड सेंटर व आरोग्य व्यवस्था उभी केली, पण त्याला जर आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसेल तर त्याचा काय उपयोग?” असा प्रश्न उपस्थित केला.
एक होतकरू पत्रकार आज दुर्दैवाने मृत्युमुखी पडला आहे आणि आता त्यांचे निधन झाल्यानंतर चौकशी करून काय उपयोग? त्यातून काय साध्य होणार? पुण्याला मुख्यमंत्री येऊन गेले. तेथे कोविड सेंटर व आरोग्य व्यवस्था उभी केली, पण त्याला जर आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसेल तर त्याचा काय उपयोग? pic.twitter.com/EYG6AO23zj
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 2, 2020
याबाबत ट्विट करताना त्यांनी, “सरकारच्या अव्यवस्थेमुळे पांडुरंग रायकर यांचा नाहक बळी गेला आहे. रायकर यांना उपचारासाठी वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही व बेडही मिळाला नाही. पत्रकाराच्या मृत्यूला यंत्रणेतील अव्यवस्था व महाविकास आघाडीचे सरकारच या मृत्यूला जबाबदार आहे.” असा गंभीर आरोप लगावला आहे.
.@CMOMaharashtra सरकारच्या अव्यवस्थेमुळे पांडुरंग रायकर यांचा नाहक बळी गेला आहे. रायकर यांना उपचारासाठी वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही व बेडही मिळाला नाही. पत्रकाराच्या मृत्यूला यंत्रणेतील अव्यवस्था व महाविकास आघाडीचे सरकारच या मृत्यूला जबाबदार आहे. @BJP4Maharashtra
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 2, 2020