मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतुन बंडखोरी करत काही आमदारांसह वेगळा गट केला आणि भाजपच्या पाठींब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं. यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रेला सुरवात केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या सर्व घडामोडींवर तितक्या स्पष्टपणे अद्याप भाष्य केलेलं नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी सामनासाठी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत त्यांना विविध विषयावर बोलत केल्याचे पाहायला मिळत आहे. या मुलाखतीचा पहिला टीजर काल आला होता ज्यात उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केल्याचे समजले होते. आता या मुलाखतीचा दुसरा टीजर आला आहे.
काय म्हंटलंय दुसऱ्या टीजरमध्ये ठाकरेंनी
विश्वासदर्शक ठरावाला तुम्ही सामोरे गेला असता तर काय झालं असत ? मुंबईचा घात करण्याचा विरोधकांचा डाव आहे का ? अशा प्रश्नांची सडेतोड उत्तर या मुलाखतीतून मिळणार असल्याचे दुसऱ्या टीजरमधून समजते, तसेच हे सरकार म्हणजे हम तुम एक कमरे मै बंद हो अशा प्रकारचे असल्याची टीका ठाकरेंनी यावेळी केल्याचे दिसून येते. तसेच अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो पण सत्तेची चटक लागली नाही असंही टीजरमध्ये ठाकरे म्हंटल्याचं पाहायला मिळत.
भाग:२
खणखणीत मुलाखत!
सामना.
"उध्दव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?"
२६ आणि २७ जुलै pic.twitter.com/RQ15tNEGse— Sanjay Raut (@rautsanjay61) July 25, 2022
एकंदरीतच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंडखोरांचा पूर्णपणे समाचार या मुलाखतीतून घेणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. त्यासोबतच ठाकरे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने शिवसैनिकांना काय आवाहन करतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. २६ आणि २७ जुलैला ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे या मुलाखतीची उत्कंठा आता शिगेला पोहचली आहे.