मुंबई : औजारंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीवरून मोठे वादंग निर्मण झाले होते. त्यावरून राजकीय वातावरण देखील तापले होते. आता त्यावरूनच पुन्हा एकदा मनसेने शिवसेनेला डिवचले आहे. औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या वेळी भाषण करताना संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का? असा सवाल करत गजानन काळेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.
होय..संभाजीनगर असे म्हणत बॅनरबाजी करायची..मी संभाजीनगर म्हणतोय ना असं सभेत म्हणायच,एवढं करून झालं का?औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार मुख्यमंत्री महोदय?
संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का?भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून आल्यावर अवघड वाटतंय सगळं.
— Gajanan Kale (@MeGajananKale) June 7, 2022
मनसेचे नेते गजानन काळे यांनी म्हंटले आहे की, तुम्ही सभेमध्ये संभाजीनगर म्हंटल म्हणजे झालं का? हे प्रत्यक्ष कधी होणार ? असा त्यांनी सवाल केला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी औरंगाबादच्या सभेनिमित्त एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. या सभेसाठी शिवसेनेनं होय… संभाजीनगर.. असे म्हणत बॅनरबाजी केली आहे. पण तुम्ही सभेत संभाजीनगर म्हणायचं, एवढं करून झालं का? औरंगाादचं संभाजीनगर कधी होणार मुख्यमंत्री महोदय? असा सवाल त्यांनी विचालाय. एवढेच नाही तर भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून आल्यावर अवघड वाटतंय सगळं. असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटाही काढला आहे.