manoj jarange – सकल मराठा समाजाच्यावतीने साताऱ्यात गांधी मैदानावर आज मनोज जरांगे- पाटील यांची सभा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या टीकेला जरांगे पाटील काय उत्तर देणार हा औत्सुक्याचा विषय आहे. सरकारने आरक्षण दिलं नाही तर खर्डा भाकरी घेऊन मंत्रालय पाहयला राज्यातला मराठा समाज येईल असा इशारा दिला जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना सर्वच राज्यकर्त्याना आणि भोकरदनमध्ये गावबंदीचा बॅनर फाडणाऱ्या तसेच मराठा समाजात दुही निर्माण करणाऱ्यांना जरांगे- पाटील यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितल्यामुळे राज्यभरात त्यांच्या सभांचे वादळ घोंगावत आहे.
अशात मनोज जरांगे पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. मीडियाशी संवाद साधण्यापूर्वी उदयनराजे भोसले हे जरांगे पाटील यांच्या कानात काही तरी पुटपुटले. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी मीडियाशी संवाद साधताना हातही जोडले. बराचवेळ हात जोडून ते कळकळीची विनंती करत होते.
उदयनराजे म्हणाले, ‘सर्वांनी मनातून… अंतकरणातून विचार करायला हवा. जातीजातीत तेढ निर्माण करू नका. काय बोलायचं? सर्वांनीच विचार करण्याची वेळ आली आहे. या देशाचे तुकडे करू नका. नाही तर या देशाची खऱ्या अर्थाने वाट लागेल, अशी हात जोडून उदयनराजे यांनी कळकळीची विनंती केली. बराचवेळ हातजोडून उदयनराजे कळकळीची विनंती करत होते. तर मराठा आरक्षणाची लढाई सुरूच राहणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले आहे.