काठमांडू – नेपाळमद्ये पुन्हा राजेशाही आणण्याच्या मागणीसाठी बुधवारी हजारो नागरिकांनी मोठा मोर्चा काढला होता. 18 व्या शतकात शाह राजघराणे ज्यांनी सुरू केले, त्या राजे पृथ्वी नारायण शाह यांच्या पुतळ्यापाशी हजारो नागरिकांनी एकत्र येऊन राजेशाही पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला.
शाह राजघराण्यातील शेवटचे राजे ग्यानेंद्र यांना 2008 साली राजेपदावरून पायउतार होणे भाग पाडले गेले होते. त्यानंतर नेपाळमधील राजेशाही अस्तंगत करण्यात आली होती आणि नेपाळला प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही नेपाळममध्ये पुन्हा राजेशाही अस्तित्वात असावी यासाठी काही जणांचे प्रयत्न सुरू आहेत.
राजे पॉथ्वी नारायण यांच्या जयंतीच्या दिवशी हे समर्थक राजेशाहीच्या समर्थनार्थ नेपाळमध्ये मोर्चा काढत असतात. यापूर्वी काढण्यात आलेल्या मोर्चाच्यावेळी निदर्शक आणि पोलिसांमध्ये हिंसाचार झाला होता. मात्र त्या तुलनेत बुधवारी झालेला मोर्चा शांततेत पार पडला. राजे पृथ्वी नारायण यांच्या जयंतीच्या दिवशी नवनियुक्त पंतप्रधान प्रचंड यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.
प्रचंड यांनी आळवला चिनी राग
संसदेमध्ये विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर संसदेला संबोदित करताना प्रचंड यांनी चीन आणि भारताबरोबरच्या संबंधांमध्ये समतोल राखला जाईल, असे म्हटले आहे. भारताने आपली म्हटलेली नेपाळची भूमी पुन्हा परत मिळवण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला. मात्र नेपाळ आणि चीन दरम्याच्या मतभेदांच्या मुद्यांवर त्यांनी कोणतेही भाष्य करणे टाळले.
#RussiaUkraineWar : सोलेदार शहर जिंकल्याचा रशियाचा दावा; युक्रेनने मात्र …
पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच प्रचंड यांनी चिनी कंपनीने बांधकाम केलेल्या नेपाळमधील विमानतळाचे उद्घाटन केले होते. प्रचंड आणि ओली या दोन्ही आजी माजी पंतप्रधान भारतापेक्षा चीनच्या अधिक जवळचे मानले जातात. आता या दोघांचे आघाडी सरकार नेपाळमध्ये सत्तेवर असल्याने भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.