मुंबई – सध्या भारतात करोनाचा फैलाव वाढतच चालला असून राज्यात सुद्धा करोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे २१ दिवसांचा लॉकडाउन आता ३ मे पर्यंत लांबला आहे. करोना कधी थांबणार आणि जनजीवन पुन्हा कधी सुरळीत होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, याच पार्शवभूमीवर जेष्ठ अभिनेते ‘मोहन आगाशे’ यांनी सुद्धा आपलं मत मांडलं आहे. “आपण सतत निसर्गाच्या विरोधात जात आहोत… आपण त्याचाच एक भाग आहोत हे विसरलो आहोत… त्यामुळे ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गविरोधातील आहे.” अशी माहिती एका प्रसिद्ध वृत्तवाहिनी दिली आहे.
‘सद्यस्थितीत कोरोनाला कसं हरवायचं नि मनुष्याच्या शरीरातून या विषाणूला कसं नष्ट करायचं यामागे मनुष्यजात लागली आहे. रात्रंदिवस कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वॉरियर्स जीवाचे रान करीत आहेत. पण ही लढाई आत्ताची नाही.’ असं सुद्धा पुढे म्हणाले.