मुंबई – देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्रामध्ये काही महत्वाची धार्मिक व पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत. बंद करण्यात आलेल्या स्थळांमध्ये अजंठा-वरून येथील जगप्रसिद्ध लेण्या, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर व तुळजापूर येथील तुळजाभवानीचे मंदिर यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त नेहमीच हजारोंची गर्दी असणाऱ्या मुंबईतील मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यास देखील सामान्य नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. यापूर्वी राज्य सरकारने शहरी भागातील शाळा, महाविद्यालये, मॉल्स व सिनेमागृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या 38 वर पोहोचली असून देशात 110 जण कोरोनाबाधित आहेत. राज्य सरकारतर्फे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत.