मुंबई – इंडिया आघाडी अशाप्रकारची कोणतीही आघाडी अस्तित्वात नव्हती. या आघाडीवर मला पहिल्यापासून शंका होती आणि ती शंका कायमस्वरूपी असणार आहे, अशी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
इंडिया आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात गोंधळ सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, एकत्रित गायचं असेल, समुहगीत गायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला कोरसमध्ये गाणे गरजेचे असते.
प्रत्येकाने एकाच दिशेने गायन करावे लागते. मात्र सध्या इंडिया आघाडीत फूट पडलेली दिसत आहे. इंडिया आघाडीचा जो प्रयत्न होता, तो आता उघडा पडला आहे. काँग्रेस पार्टी इतर राज्यातील लहान-मोठ्या पक्षांना सोबत घेऊन ही आघाडी करत होता.
परंतु या लहान-मोठ्या रिजनल पक्षांची व्होट बँक काँग्रेसकडे जाऊ नये, याचीही काळजी तेथील रिजनल पक्ष घेत आहेत. त्या रिजनल पक्षांची काँग्रेसशी स्पर्धा आहे. त्यामुळे ते काँग्रेससोबत आपला व्होट शेअर करू शकत नाही, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.