मुंबई – भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात असलेल्या वादामुळेच भारतीय संघात दोन गट तयार होत फुट पडली होती. मात्र, त्याची व्याप्ती वाढू नये यासाठी तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हस्तक्षेप केला, असा धक्कादायक खुलासा भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी आपल्या कोचिंग बियॉंड या पुस्तकात केला आहे.
2019 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान या बातम्या सर्वात प्रथम प्रसारीत होऊ लागल्या होत्या. त्यात काही प्रमाणात तथ्यही होते. कोहलीकडून नेतृत्व काढून घेतले गेल्याने त्याच्यात व रोहितमध्ये बिनसले होते.
ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी शास्त्री यांनीच पुढाकार घेत हस्तक्षेप केला. मात्र, त्यावेळी या दोन खेळाडूंमुळे भारतीय संघात दोन गट तयार होत होते व फुटही पडत होती, असे श्रीधऱ यांनी आपल्या पुस्तकात नमुद केले आहे.
#RussiaUkraineWar : बाखमत शहरात युक्रेन आणि रशियाच्या सैन्यामध्ये जोरदार धुमश्चक्री
शास्त्रींची मध्यस्थी यशस्वी ठरली
2019 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला न्यूझीलंकडून पराभूत व्हावे लागले व त्याचवेळी या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. या स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजला रवाना झाला होता व तेथे शास्त्री यांनी रोहित व कोहलीला आपल्या रुममध्ये बोलावले होते. त्यावेळी वैयक्तीक कारणे बाजुला ठेवा व झाले गेले विसरून पुढे चला. हा वाद येथेत संपवा असा सल्ला दिला व तोच यशस्वी ठरला, असेही श्रीधर यांनी सांगितले आहे.