पुणे – ताडिवाला रस्ता परिसरात करोना आटोक्यात येत आहे, पण दुसऱ्या बाजूला या भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच मिळत नसल्याने महिलांना वणवण फिरावे लागत आहे. हातपंपावर रांगा लावून जीव धोक्यात घालावा लागत आहे. “आम्हालाही करोनाची भीती वाटते, पण प्यायलाच पाणी नाही तर हात कुठून धुणार?’ असा उद्विग्न सवाल येथील महिला व्यक्त करत आहेत.
ताडिवाला रस्ता भागात गेल्या महिनाभरात करोनाबाधितांची संख्या लक्षणीय वाढली होती. त्यामुळे ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांना नागारिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ाधितांची संख्या नियंत्रित आली. मात्र, आता गेल्या चार दिवसांपासून प्यायला पाणीच नसल्याने या नागरिकांना नाईलाजास्तव बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगही पाळता येत नसल्याचे चित्र आहे.
पाण्यासाठी महिला हातपंपावर येत असून तर काहींना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाणी नसल्याने सार्वजनिक शौचालयदेखील अस्वच्छ झाले आहे. त्यामुळे पुन्हा करोनाचे बाधित वाढण्याची भीती आहे. ही बा लक्षात घेऊन पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी भिम छावा संघटनेने केली आहे. तसेच दखल न घेतल्यास महापालिकेवर महिलांचा मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.