नाशिक – हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम सध्या सुसाट सुरू आहे. देशातील सर्वात रूंद म्हणून ओळखले जाणारे इगतपुरीजवळील कसारा घाटातील बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. नांदगाव सदो ते शहापूर तालुक्यातील वाशाळापर्यंत या महाकाय दुहेरी बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या बोगद्यांची लांबी आठ किलोमीटर आहे, तर रूंदी 17.5 मीटर आहे. मुंबईला जाण्यासाठी व येण्यासाठी या बोगद्यांचा वापर होणार आहे.
समृद्धी मार्ग मुंबई ते नागपूर दरम्यान तयार करण्यात येत आहे. या महामार्गाची लांबी 700 किलोमीटर आहे. त्यासाठी 55 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. इगतपुरी जवळील बोगद्यासाठी 2745 कोटींचा खर्च आला. या कामाची सुरुवात 6 सप्टेंबर 2019 रोजी झाली होती. सप्टेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण करायचे होते. त्यापूर्वीच 14 सप्टेंबरला हे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी ऑस्ट्रियन तंत्रज्ञान वापर करण्यात आला आहे.