मुंबई – आज सकाळ पासूनच मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे.
दरम्यान, या पावसाने आतापर्यंत तिघांचा बळी घेतला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. काशिमा युडीयार (वय-60), राजेंद्र यादव (वय-60), संजय यादव (वय-24) अशी मृतांची नावे आहेत. विजेचा शॉक लागून या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.