मुंबई – ईडीमधील जामीन न मिळणारा प्रकार अतिशय भयानक ठरतो, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
न्याय व्यवस्थेत एखाद्या व्यक्तीवर दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला जामीन मिळणे हा त्याचा हक्क आहे. परंतु ईडी व तत्सम विभागात तसे होत नाही. त्यामुळेच नवाब मलिक, अनिल देशमुख तसेच याआधी अटक झालेले काही लोक अजूनही जेलमध्ये आहेत, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.