नवी दिल्ली – नरक चातुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या दिवाळीच्या दिवशी निघालेल्या फटाक्यांचे परिणाम भारतभर दिसून येत आहेत. सोमवारी सकाळीच दिल्ली-एनसीआरमध्ये धुक्याची दाट चादर दिसली.
मात्र, ही परिस्थिती केवळ या भागापुरती मर्यादित नसून दिवाळीनंतर इतर अनेक शहरांमध्येही प्रदूषणाचा हा परिणाम दिसून येत आहे. यामध्ये मुंबई आणि कोलकातासारख्या मेट्रो शहरांचाही समावेश आहे. या दोन्ही शहरात सकाळीच धुरके (धूर आणि धुके) होते.
भारतातील रिअल-टाइम हवेच्या दर्जाचा निर्देशांह अर्थात एक्युआयची माहिती देणाऱ्या वेबसाइटनुसार, दिवाळीनंतर भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचे नाव आहे, परंतु ते शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. बिहारची राजधानी पाटणा पहिल्या क्रमांकावर आहे. पाटण्यामध्ये सकाळी सरासरी 572 एक्युआय नोंदवला गेला.
दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा 450 एक्युआय होता. दिल्लीच्या शेजारी असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडाचा एक्युआय 410 म्हणजेच अत्यंत धोकादायक श्रेणीत नोंदवला गेला. त्याच वेळी, गाझियाबाद, यूपीमध्ये एक्युआय 400 च्या वर राहिला.
दुसरीकडे, हरियाणाच्या रोहतकमध्ये 380 च्या एक्युआय आसपास नोंदवला गेला. देशातील टॉप-5 प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली-एनसीआरमधील तीन शहरांचा समावेश आहे. दुसरीकडे, भारतीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, प्रदूषणामुळे भारतातील मेट्रो शहरांची स्थितीही अत्यंत वाईट आहे.
मुंबईच्या बहुतांश भागात, एक्युआय सरासरी 200 च्या आसपास राहतो. इथे सकाळी दिल्लीसारखी धुक्याची चादर दिसली. दुसरीकडे, पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील सहा पैकी पाच स्थानकांमध्ये सरासरी एक्युआय 200 पेक्षा जास्त नोंदवला गेला आहे.
या मेट्रो शहरांव्यतिरिक्त, बंगळुरू, कर्नाटकमधील हवेची गुणवत्ता सर्वोत्तम आहे. येथील एक्युआय चांगल्या ते मध्यम श्रेणीत (70-120) होता. जर आपण संपूर्ण भारताच्या सरासरी एक्युआयबद्दल बोललो तर दिवाळीनंतर त्याचा आकडा 182 वर पोहोचला आहे.
सध्या भारतात पीएम 2.5 कणांची सरासरी आहे, जी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा सात पट जास्त आहे. दुसरीकडे, देशातील वातावरणात पीएम-10 चे सरासरी 151 कण आहेत, जे सामान्यपेक्षा कितीतरी जास्त आहे.
टॉप 10 प्रदुषित शहरे…
क्र., शहर, एक्युआय
1 पटना 550+
2 दिल्ली 450+
3 नोएडा 400+
4 गाझियाबाद 400+
5 रोहतक 350+
6 राजगीर 350+
7. फरीदाबाद +
8 सोनीपत 350+
9 भागलपूर 350+
10 हावडा 350