नवी दिल्ली – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरुवारी सांगितले की, ‘अग्निवीरांच्या पहिल्या दोन तुकड्या फील्ड युनिट्समध्ये तैनातीसाठी पूर्णपणे तयार आहेत आणि त्यांचा प्रतिसाद खूप चांगला आणि उत्साहवर्धक आहे.
१२० महिला अधिकार्यांना कमांड रोलमध्ये कायमस्वरूपी कमिशन देण्यात आले असून त्यांना फील्ड एरियामध्येही तैनात करण्यात आले आहे. ती तुकडीही चांगले काम करत आहे.
नरल मनोज पांडे म्हणाले की, गेल्या वर्षभरात ईशान्येतील परिस्थिती सुधारली असून सरकारने आखलेली धोरणे याला कारणीभूत आहेत. हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये हिंसाचार झाला होता पण राज्य सरकार,
लष्कर आणि आसाम रायफल्स यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आता परिस्थिती स्थिर आहे आणि आम्ही परिस्थिती सामान्य करण्यासाठी काम करत आहोत. त्यामुळे अग्नीवीर ही संकल्पना वास्तवात खरोखर उपयोगाची ठरली आहे, असेही पांडे म्हणाले.