नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाउन १४ एप्रिल रोजी म्हणजे आज संपणार होता त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली. दरम्यान, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने लॉकडाउनच्या काळात आपल्या सामूहिक शक्तीचे दर्शनच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
बाबा साहेब डॉक्टर भीम राव आंबेडकर की जन्म जयंती पर, हम भारत के लोगों की तरफ से अपनी सामूहिक शक्ति का ये प्रदर्शन,ये संकल्प, उन्हें सच्ची श्रद्धांजलि है: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pic.twitter.com/0rIob5phb4
— ANI_HindiNews (@AHindinews) April 14, 2020
मोदी म्हणाले, “आपण देशासाठी एका शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे आपले कर्तव्य बजावत आहात. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आदरपूर्वक नमन करतो. आपल्या संविधानात ज्या ‘वुई द पिपल ऑफ इंडिया’ या शक्तीचा उल्लेख केला आहे, तो हाच तर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण भारताच्या जनतेच्यावतीनं आपल्या सामूहिक शक्तीचं दर्शन, संकल्प दाखवून द्यावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल.”