नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाउनच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सकाळी जनतेला संबोधित केले. यामध्ये ३ मेपर्यंत देशात लॉकडाउन वाढवले आहे. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक राज्यातील स्थितीचे मुल्यांकन करण्यात येणार आहे.
ज्या राज्यात करोना नियंत्रणात आणले जाईल, तेथील नियम शिथील केले जाणार असल्याचीही माहिती नरेंद्र मोदी यांनी सांगितले. करोनाशी लढाई करण्यासाठी सप्तपदी देत असून या सप्तपदीचे योग्य प्रकारे पालन करावे असे आवाहन मोदी यांनी देशातील नागरिकांना केले आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्रालया जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज देशातील करोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. यामध्ये ७६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यातील सध्या ८९८८ रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. करोनामुळे ३३९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
‘या’ सप्तपदींचे पालन करण्याचे पंतप्रधानांनी केले आवाहन
१) घरातील वृद्धांची जास्त काळजी घ्या… ज्यांना आजार आहे त्यांची जास्त काळजी घ्या
२) लॉकडाउन आणि सोशल डिस्टिसिंगचं पूर्णपणे पालण करा.
३) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष्य मंत्रालयाच्या सुचेनचं पालन करा.
४) करोना संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करा.
५) जवळ असलेल्या गरिब परिवांराची आवशकता पुर्ण करा
६) व्यवसाय, उद्योजकांनी कामगारांबाबत संवेदना बाळगा, कोणालाही कामावरून काढू नका
७) देशातील करोना योद्धांचा (डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कमगार आणि इतर कर्मचारी) सन्मान करा