नवी दिल्ली – हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांना महामार्गावरच अटक करण्यात आली. राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाणार आहे.
जनता ये समझती है कि उनकी(राहुल गांधी) हाथरस की तरफ कूच राजनीति के लिए है, इंसाफ के लिए नहीं: राहुल गांधी के आज हाथरस जाने पर केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी #HathrasCase pic.twitter.com/gnyAMPjT9R
— ANI_HindiNews (@AHindinews) October 3, 2020
यावरून देशभरातून उत्तरप्रदेशातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. याच पार्श्वभूमीवर महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या,’ जनता सर्व समजून घेते आहे, उत्तर प्रदेशातील घटनेवरून हा फक्त त्यांचा ( राहुल गांधी ) कुटील डाव आणि राजकारण आहे. असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर खोचक टीका केली आहे.
कोणतीही ताकद मला रोखू शकत नाही; राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाणार
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी शुक्रवारी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. उत्तरप्रदेश प्रशासन सत्य लपवण्यासाठी पाशवीपणा करत आहे, असा आरोप त्यांनी केला. राहुल यांनी ट्विटरवरून उत्तरप्रदेश सरकारवर निशाणा साधला. आमच्याबरोबरच मीडियालाही पीडितेच्या कुटूंबीयांना भेटू देण्यात आले नाही. पीडितेच्या कुटूंबीयांना घराबाहेरही पडू दिले जात नाही. त्यांना मारहाणही करण्यात आल्याचे समजते. कुठलाच भारतीय अशा वर्तणुकीचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसच्या शिष्टमंडळास पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्थेत रोखण्यात आले होते.