लखनऊ – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा अनेक राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. परंतु, रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आज अखेर रामदास आठवलेंनी आपले मौन सोडले.
रामदास आठवले म्हणाले कि, हाथरस घटना मानवतेवरचा डाग आहे. आरोपीला फाशी देण्यात यावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती या मुद्यावरून राजकारण खेळत आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा अधिकार त्यांना नाही, अशी टीका आठवले यांनी केली आहे.
The #Hathras incident is a blot on humanity. The accused should be hanged to death & the family should be given justice. Mayawati is playing politics over the issue. She has no right to demand resignation of CM Yogi Adityanath: Union Minister Ramdas Athawale in Lucknow pic.twitter.com/vgszTwdi71
— ANI UP (@ANINewsUP) October 3, 2020
दरम्यान, हाथरस आणि बलरामपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनांचा संदर्भ देऊन बसपाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा योगींनी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या जागी सक्षम नेत्याला मुख्यमंत्री बनवायला हवे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला ते जमणार नसेल तर उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी, असे मायावती यांनी म्हटले होते.