मुंबई -ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता, त्या महाराष्ट्र भूमीची सुरक्षा घेणाऱ्या मुंबई पोलिसांची खोटी बदनामी करायला तुम्हाला ८० हजार फेक अकाउंट्स तयार करावे लागतात. पण शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स आहेत, महाराष्ट्र व मुंबईची जनता आहे. जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात. असं म्हणत शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांना सुनावलं आहे
ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता त्या महाराष्ट्र भूमीची सुरक्षा घेणाऱ्या मुंबई पोलिसांची खोटी बदनामी करायला तुम्हाला 80 हजार फेक अकाउंट्स तयार करावे लागतात. पण शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स आहेत, महाराष्ट्र व मुंबईची जनता आहे जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात.
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) October 7, 2020
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयला मदत करण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञांची जी एक फॉरेन्सिक समिती नेमण्यात आली होती, त्या समितीने सुशांतसिंह याची हत्या झालेली नसून ती एक आत्महत्याच आहे, असा स्पष्ट निर्वाळा दिला.
यानंतर अहवालाबाबत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपलं व्यक्त केलं होत. तर आता वृत्तवाहिनीशी बोलताना परमबीर सिंग म्हणाले, ‘ या प्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करण्यात आले होते. तसेच मुंबई पोलिसांच्या चौकशीला बदनाम करण्यासाठी ८० हजारहून अधिक बनावट खाती तयार केली होती.
ते पुढे म्हणाले की, यातून जे हॅशटॅग ट्रेण्ड झाले ते केवळ सुशांतच्या मृत्यूशी संबंधित असेच होते असं कळतं आहे. आम्ही परदेशी भाषांमध्ये असलेल्या या पोस्ट आम्हाला ओळखता आल्या, कारण या पोस्टमध्ये हॅशटॅग वापरण्यात आलेले होते. जसे की #Justiceforsushant #sushantsinghrajput #SSR आणखी काही खात्यांची पडताळणी करण्याचं काम आम्ही करत असल्याचं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
तत्पूर्वी, परमबीर सिंग यांनी फॉरेन्सिक समिती समितीने सुशांतसिंह याची हत्या झालेली नसून ती एक आत्महत्याच आहे, असा स्पष्ट निर्वाळा दिल्यानंतर ‘आम्ही खरे आहोत’ असं म्हणत आपली भूमिका मांडली होती.