बावडा (वार्ताहर) – बावडा (ता. इंदापूर) परिसरात गेल्या पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रविवारी रात्रभर झालेल्या पावसाने पाझर तलाव फुल्ल भरले आहेत. या भागातील ओढे, नालेदेखील ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून बावडा व परिसराला चागल्या पावसाची वाट प्रतीक्षा होती. अशातच शेतात हाताला कामं नसल्याने आर्थिक टंचाईचा मोठा फटका शेतकरी, शेतमजूर व शेतीवर आधारित सर्वच व्यवसायाला बसला. बावडा येथील पाझर तलाव गेल्या दहा ते पंधरा वर्षांत कधी वाहिलाच नव्हता. यंदा जून महिन्यातच तो ओसंडून वाहू लागला आहे.