नवी दिल्ली: भारतातील करोनाबाधितांच्या संख्येने गुरूवारी 2 हजारांचा टप्पा ओलांडला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशातील करोनाबाधितांची संख्या 2 हजार 358 तर मृतांची संख्या 73 इतकी झाली.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील बाधितांची संख्या 2 हजार 69 तर मृतांची संख्या 53 वर पोहचली आहे. देशात सर्वांधिक करोनाबाधितांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तामीळनाडूत 300 हून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. केरळ आणि दिल्लीतील करोनाबाधितांची संख्या 300 जवळ जाऊन पोहचली आहे.