मुंबई : कोरोना विषाणूने जगभरात कहर केला आहे. गेल्या २४ तासात ५१ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोना बाधितांची संख्या ९ हजार ३५२ वर पोहचली आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत ३२४ वर गेली आहे. रुग्णालयात ८ हजार ४८ जणांवर उपचार सुरु असून,९९७ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
देशात आतापर्यंत २ लाख ६ हजार २१२ जणांचे कोरोना टेस्ट करण्यात आले आहे. ८५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोरोना विषाणूसंदर्भात चर्चा करण्यात आहे.
दरम्यान, मुंबईतील एका नामांकित वाहिनीचे सक्रिय पत्रकार यांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने तसेच अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या सुमारे 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना समजली, त्यांनी तात्काळ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याशी संपर्क साधून या सर्व माध्यमातील लोकांची चाचणी करावी असे निर्देश दिले.