रवींद्र कदम
147 कर्मचाऱ्यांच्या कामाचा बोजा 30 कर्मचाऱ्यांवर
नगर – शहराची लोकसंख्या साडेतीन लाखाहून अधीक असून, नियमानुसार 50 हजार लोकसंख्येमागे एक मोठे अग्निशमन वाहनाची आवश्यकता आहे. त्यामुळे नगर शहरात नियमानुसार सात मोठी वाहने आवश्यक असून, प्रत्येक वाहनावर 21 कर्मचाऱ्यांची अवश्यकता आहे. त्यानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागात 147 कर्मचारी असावेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ दोन मोठी व दोन छोटी वाहने असून 30 कर्मचाऱ्यांवर महापालिका अग्निशमन विभागाचा डोलारा चालत आहे.
त्यातही अनेक कर्मचारी हे वेगवेगळ्या विभागाचे असून त्यांना कुठलेही टेक्निकल कोर्सचे प्रशिक्षण दिले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहराची सुरक्षा एक प्रकारे राम भरोसेच असल्याचे दिसत आहे. त्यातच सावेडीतील अग्निमशन उपकेंद्रामंध्ये वाहन नसल्याने ते नावालाच उरले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाबाबत महापालिका प्रशासनाची अनास्था दूर होत नाही. यातच कर्मचारी व वाहनांच्या अभावामुळे केडगाव पाठोपाठ सावेडीचेही अग्निशमन उपकेंद्र बंद झाले आहे. शहरात मोठी आग लागल्यास महापालिकेकडे पुरेसी वाहनेही नाहीत.
त्यामुळे पर्यायाने महापालिकेच्या अनास्थेचा फटका सामान्य करदात्या नगरकरांना बसत आहे. महापालिका प्रशासनाकडे अग्निशमन विभागाची तीन केंद्रे आहेत. अग्निशमन विभागाकडे दोनच मोठी वाहने असल्याने यातील केडगावचे केंद्र सुमारे एक वर्षांपासून बंद आहे. तसेच सावेडी उपकेंद्रात असलेले मोठे अग्निशमन वाहन यांत्रिक बिघाडामुळे दुरूस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सावेडी उपकेंद्रात वाहन नसल्याने तेथील सर्व कर्मचारी माळीवाडा येथील केंद्रात वर्ग करण्यात आले आहेत.
शहराची लोकसंख्या साडेतीन लाखाहून अधिक असून, नियमानुसार 50 हजार लोकसंख्येमागे एक मोठे अग्निशमन वाहनाची अवश्यकता आहे. हेच पथक आपत्तीव्यवस्थापनाचे काम करते. त्यामुळे शहरात येणाऱ्या आपत्तीविषयी महापालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांना गांभीर्यच नसल्याचे दिसत आहे.
ही स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने मालमत्ता कराच्या दोन टक्के अग्निशमन कर आकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मांडण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
या प्रस्तावाचा चेंडू स्थायी समितीने महासभेच्या गोटात लोटला. 19 फेब्रुवारीपर्यंत महासभाच न झाल्याने हा कर वाढीचा निर्णय अजूनही झालेला नाही. मालमत्ता करात दोन टक्के अग्निशमन कर आकारल्यास त्यातून येणारा निधी वेगळा ठेऊन अग्निशमन विभागाची उपकेंद्रे अद्ययावत करणे, नवीन वाहने खरेदी करणे व मनुष्य बळ भरणे अशी कामे करण्यात येतील असे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
सध्या तरी महापालिकेच्या अग्निशमन विभागात मानधनावर 20 कर्मचारी भरती सुरू आहे. 12 हजार लिटर क्षमतेचा अग्निशमन बाऊझर वाहनाचा प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. तोपर्यंत मात्र नगरकरांची सुरक्षा रामभरोसे आहे. नगर शहरात मोठी आग लागल्यास महापालिकेकडे पुरेशी वाहने नसल्याने महापालिका जवळील नगरपालिकांच्या अग्निशमन विभागाची वाहने पाचारण करते.
महापालिकेच्या हद्दीतील मालमत्तांना नगर शहरात लागली आग महापालिकेच्या वाहनांनी विझविल्यास कोणताही शुल्क आकारला जात नाही. मात्र महापालिका हद्दीतील मालमत्तेला लागलेली आग विझविण्यासाठी शहराजवळील नगरपालिकांची वाहने महापालिकेने बोलावल्यास संबंधित मालमत्ताधारकाला या नगरपालिकांना शुल्क भरावा लागतो. महापालिका अग्निशमन विभागाच्या अपुऱ्या वाहनांचा भूरदंड आगीत मालमत्तेची नुकसान झालेल्या नागरिकालाच भरावा लागत आहे.
काम टेक्निकलच; पगार बिगाऱ्याचा
या विभागात गेली दहा बारा वर्षांपासून काम करत आहे. त्यासाठी कुठलाही कोर्स आम्ही केला नाही. अनुभवातून शिकलो आम्ही. आजही एखादा कोर्स करून आलेल्या कर्मचाऱ्यांना त्या बारीक सारीक गोष्टी माहीत नाही त्या आम्हाला माहीत आहेत. त्यामुळे आग आटोक्यात कशी आनायची हे आम्हाला चांगलं माहिती आहे. मात्र, त्याचा मोबादला आम्हाला मिळत नाही हीच खंत आहे. काम टेक्निकलच करायच पगार मात्र बिगाऱ्याचा घ्यायचा अशी परिस्थिती आहे भाऊ.
काम टेक्निकलच; पगार बिगाऱ्याचा
या विभागात गेली दहा बारा वर्षांपासून काम करत आहे. त्यासाठी कुठलाही कोर्स आम्ही केला नाही. अनुभवातून शिकलो आम्ही. आजही एखादा कोर्स करून आलेल्या कर्मचाऱ्यांना त्या बारीक सारीक गोष्टी माहीत नाही त्या आम्हाला माहीत आहेत. त्यामुळे आग आटोक्यात कशी आनायची हे आम्हाला चांगलं माहिती आहे. मात्र, त्याचा मोबादला आम्हाला मिळत नाही हीच खंत आहे. काम टेक्निकलच करायच पगार मात्र बिगाऱ्याचा घ्यायचा अशी परिस्थिती आहे भाऊ.