नवी दिल्ली – पेगासस प्रकरणात आज कॉंग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटले आहे की संसदेला धोका दिला गेला, सुप्रीम कोर्टाला फसवले गेले, लोकशाही हॅयजॅक केली गेली, आणि सरकारकडूनच देशद्रोह झाला अशा शब्दात न्युयॉर्क टाईम्सने पेगासस प्रकरणात आज जो गौप्यस्फोट केला आहे त्यावर कॉंग्रेसने आपली प्रतिक्रीया दिली आहे.
राहुल गांधी यांनी म्हटलं की, मोदी सरकारने आपल्या लोकशाही संस्था, राजकारणी, सरकारी अधिकारी, विरोधी पक्ष नेते, सेनादल व न्याय व्यवस्थेतील अधिकारी यांच्या विरोधात हेरगिरी करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरले. त्यातून त्यांची हेरगिरीही केली गेली. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे.
यापूर्वी या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वत:हून दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आणि त्यांनी संसदेबरोबरच कोर्टाचीही जी दिशाभुल केली गेली आहे त्यावर त्यांनी सरकारला जाब विचाराला पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केली आहे.