मुंबई – भाजपचा टिपू सुलतान यांना विरोध म्हणजे भारतीय राज्यघटनेला विरोध आहे हे स्पष्टपणे दिसत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
भाजप टिपू सुलतान यांच्या नावाने राजकारण करत आहे. तुम्ही राज्यघटना पाहिली किंवा वाचली आहे का? असा थेट सवाल नवाब मलिक यांनी भाजपला विचारला आहे.
घटना निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतील भाग-15 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व गुरु गोविंद सिंहजी यांचे छायाचित्र व कार्याचा गौरव करणारा उल्लेख केला आहे, तर भाग-16 मध्ये राणी लक्ष्मीबाई व टिपू सुलतान यांचे छायाचित्र व त्यांच्या कार्याचा गौरव करणारा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांना विरोध म्हणजेच भाजप घटनेला विरोध करतेय असे दिसत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.