सातारा – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी “शिवशक्ती परिक्रमा’ दौऱ्यात लक्षवेधी वक्तव्य केले. मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित नसल्याने न्यायालयात आरक्षण टिकले नाही, असा टोला त्यांनी लगावला.
भाजप नेत्या पंकजा मुंडे या सध्या “शिवशक्ती’ परिक्रमा करत आहेत. यात त्यांनी अहमदनगरहून नाशिकला जाऊन सप्तश्रृंगीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या पुण्यात दाखल झाल्या. पुण्यातून त्या साताऱ्यात पोहोचल्या. त्यांनी लोणंद, फलटण, दहिवडी, शिखर शिंगणापूर असा दौरा केला. त्यावेळी फलटण येथे पत्रकारांशी संवाद साधताना, त्यांनी राज्यात सध्या तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे विधान केले. त्या म्हणाल्या, मराठा आरक्षणाचा मसुदा व्यवस्थित असता, तर मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळाले असते.
मात्र, तो व्यवस्थित नसल्याने न्यायालयात आरक्षण टिकले नाही. दरम्यान, शिखर शिंगणापूरमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांचे स्वागत केले. दोघांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले. माझी शिवशक्ती परिक्रमा सुरू आहे. दोन शक्तिपीठांचे दर्शन मी घेतले. लोकांना भेटण्याची माझी तीव्र इच्छा होती. माझे साताऱ्यात उत्साहात स्वागत झाले, असे त्या म्हणाल्या.
स्पृश्य–अस्पृश्यता
आणि रूढी-परंपरेच्या विरोधात त्यांनी बंड केले. या बंडापासून सनातन धर्माने धडा घेतला व सामाजिक न्यायाचे तत्त्व स्वीकारले. धर्म जागच्या जागीच आहे; पण अस्पृश्यता, रूढी-परंपरांना मलेरिया, डेंग्यूप्रमाणे आपण खतम केले. उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माचा हा इतिहास समजून घेतला पाहिजे. दुसरे असे की, द्रविड विरुद्ध सनातन हा संघर्षाचा इतिहासही जुनाच आहे. त्याच संघर्षातून दक्षिणी लोकांचा हिंदी विरोध वाढला. ते हिंदू धर्म, त्यांचे देव, परंपरा मानायला तयार नाहीत. ‘द्रविडी’ पक्षाचा पायाच ब्राह्मणवादाच्या विरोधाचे प्रतीक म्हणून घालण्यात आला. द्रविडी लोकांचे अंत्यसंस्कार हे दहन नव्हे, तर दफन पद्धतीने होतात.
जयललिता, उदयनिधी स्टालिनचे आजोबा करुणानिधी यांचेही दफन करण्यात आले. तामीळनाडूत सनातन विरोध इतका टोकाचा आहे की, तेथे ‘पौर्णिमे’ऐवजी अमावास्येला मंगल कार्ये, उद्घाटने, शुभारंभ केले जातात. अशा द्रविडी स्थानातून सनातन धर्मास विरोध होणे ही बाब आश्चर्यकारक नाही. जातीयता, आर्थिक भेदभाव व अस्पृश्यता या चिडीतून दक्षिणेत सनातनविरोधात ठिणगी पडली. तशी ती वारंवार महाराष्ट्रातही पडली. भिक्षुकशाही, राजकीय-सामाजिक पेशवाई, जाती-प्रथा याविरोधात महाराष्ट्राने सतत बंड केले.
मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नाकारला तेव्हा ब्राह्मण असलेल्या साने गुरुजींनी उपोषण आरंभले. जातीयतेचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्रातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज जातपात मानत नव्हते. त्यांचे सैन्य, अष्टप्रधान मंडळाची रचना तेच दर्शवते. त्यामुळे द्रविडी नेत्यांचा सनातन विरोध हा अज्ञानावर आधारित आहे व ते त्यांचे प्रांतीय राजकारण आहे. 1924 मध्ये केरळमधल्या त्रावणकोर येथील राजाच्या
मंदिरात येण्या–जाण्याच्या
रस्त्यावर दलितांना प्रवेशबंदी करण्यात आली. त्यातून दलितांनी बंड केले. राजाने ते आंदोलन दडपून टाकले. तेव्हा ई. व्ही. रामास्वामी म्हणजेच पेरियार यांनी त्या आंदोलनात उडी घेतली. त्यांनी दीर्घकाळ दलितांच्या हक्कासाठी लढा दिला. तुरंगवास भोगला. पेरियार यांच्याप्रमाणे अनिष्ट प्रथांविरोधात लढणारे अनेक कर्ते पुरुष हिंदू धर्मात निर्माण झाले. महाराष्ट्रात डॉ. आंबेडकरांच्या चळवळीस उच्च वर्णीयांचा सक्रिय पाठिंबा होताच. महाडच्या चवदार तळय़ाचा संघर्ष करण्यामागे सुरबा नाना टिपणीस होते. आगरकर, फुले, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, जोतिबा फुले, गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांच्या चरित्रांचे पारायण उदयनिधींनी करायला हवे. बाबा आमटे यांनी जातपात न पाहता कुष्ठ रोग्यांना नवे जीवन दिले.
जगात असे उदाहरण नसेल. महाराष्ट्राची संतपरंपरा ही सनातनी असली तरी सामाजिक सुधारणा स्वीकारणारी होती. जगातील कोणताही धर्म निर्दोष नाही. प्रत्येक धर्मात पाखंडाचा अंश आहे. भाजपचे हिंदुत्व जसे ढोंगी तसे ढोंग सर्वच धर्मांत आहे. वीर सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी, पण त्यांचा दृष्टिकोन विज्ञानवादी होता. सनातन धर्म गाईला देवता-माता मानतो. वीर सावरकरांना गोमातेचे थोतांड मान्य नाही. बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट, पण त्यांनीही स्पष्टच सांगितले, शेंडी-जानव्याचे, घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व आपल्याला मान्य नाही. याउलट भाजपचे आहे. ते निवडणुकीत राम-बजरंग बली आणतात व लोकसभेत राजेशाहीचे प्रतीक म्हणून ‘सेंगोल’ आणतात.
हे विज्ञान नसून रूढीवाद आणि हुकूमशाही आहे. समाजाला जुन्याच परंपरांत व जोखडात अडकवणारा ‘सनातनी’ विचार नव्या पिढीस मान्य नाही. धर्म तसाच राहील. जुनाट परंपरा, रूढी, विषमतेची जळमटे गळून पडतील. उदयनिधी स्टालिन, रशियात लेनीन आणि स्टॅलिनचा विचारही टिकला नाही. त्यांचे पुतळे लोकांनी तोडले, पण हिंदुस्थानात सनातन धर्म आहे. राहील!