नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने देशाला आता अशा स्थितीत नेले आहे की छोटे देशही भारताला आता आव्हान देण्याची भाषा करीत आहेत आपल्या सारख्या महान देशाची ही अवस्था दुर्देवी आहे, अशी टीका आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने दिलेल्या प्रतिक्रीयेत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे की, या स्थितीमुळे प्रत्येक भारतीयाला वेदना होत असून हे दु:ख अंतहीन आहे.
भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्यानंतर त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरून विपरित प्रतिक्रिया आली आहे. अनेक इस्लामिक देशांनी या प्रकरणी भारताचा निषेध केला असून त्यांनी भारताकडून माफीचीही मागणी केली आहे त्या पार्श्वभूमीवर सिसोदिया यांनी हे वक्तव्य केले आहे.
त्यांनी हिंदीतून दिलेल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, इतने छोटे छोटे देश को भारत जैसे महान देश को आंख दिखाने की हिम्मत हो गई? मोदीजी और भाजपाने देश का क्या हाल कर दिया. आज हर भारतवासी बेहद पिडित है, दुख की सीमा नहीं है’