मुंबई – महाराष्ट्रातील भाजपचे नेते सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन केले.
लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. भाजपच्या वतीने देशभर हा कार्यक्रम आखला गेला आहे. महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्येही यात्रा निघणार आहे.
तब्बल 19 हजार 567 किमी प्रवास केंद्रीय मंत्री करणार आहे. यामध्ये आपापल्या मतदार संघात न जाता इतर जिल्ह्यात मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड हे नेते महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत.
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. जन आशीर्वाद ही तर तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले सर्वाना माहिती आहे की जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणं होय. सद्य परिस्थितीत ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात… ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. भाजप नेते हे मुद्दाम करत आहेत. हे जनआशीर्वाद यात्रा म्हणजे राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न करणे होय. असं म्हणत त्यांनी भाजपच्या या यात्रावर टीका केली आहे.