मुंबई: राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होणे दूर आधीपेक्षा झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात आज एका दिवसातील सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
आज 5 हजार 24 करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे. यापैकी 79 हजार 815 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर 65 हजार 829 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज एकूण 2 हजार 362 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.25 टक्के एवढं आहे. राज्यात आज 175 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 91 मृत्यू मागील 48 तासातील आहेत, तर उर्वरित 84 मृत्यू मागील कालावधीतील आहेत.
मृत्यूंमध्ये मुंबईतील 73, नाशिक 3, ठाणे 2, मीरा भाईंदर 1, पिंपरी चिंचवड 1 नंदुरबार 1 आणि औरंगबाद 1 यांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर 4.65 टक्के एवढा आहे.