भोर -छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भोर वेल्ह्याच्या भूमीत रायरेश्वर, राजगड, व तोरणा गडावरील शिवमंदिरांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने मंदिरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
झालेल्या पडझडीचे सरकारने नुकसनीचे पंचनामे तातडीने करावेत आणि या गड किल्ल्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भोर तालुका दुर्ग संवर्धन समितीतर्फे भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद महाराष्ट्र प्रांत, भोर तालुका दुर्ग संवर्धन समिती भोर, शिलेदार प्रतिष्ठान भोरचे संस्थापक अध्यक्ष राजेश नारायण महांगरे, सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठानचे, पराग शिळीमकर,आम्ही भोरकरचे समीर घोडेकर.
सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे सचिन देशमुख यांनी ही मागणी केली, असून यावेळी भोर तालुका शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.