नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजेतेपद मिळवेल, असा विश्वास प्रमुख प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीला या स्पर्धेत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. मात्र, यंदा हा दुष्काळ संपेल असेही पॉंटिंग यांनी म्हटले आहे.
2008 सालापासून आयपीएलचा भाग असलेल्या दिल्लीने आतापर्यंत फक्त एकदाच अंतिम फेरी गाठली आहे. याआधी संघाचे नेतृत्व गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग व श्रेयस अय्यर यांच्याकडे होते तरीही संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे.