पुणे – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे, नागरिकांनी गॅस सिलेंडर घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे.
मोदींनी लॉकडाऊन जाहीर करताना अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याचेही स्पष्ट केले होते. बंदमुळे तुटवडा निर्माण होईल, या शक्यतेने विश्रांतवाडीमधील शांतीनगर येथे नागरिकांनी गॅस सिलेंडर घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे. यातील काही नागरिकांनी मास्कदेखील लावले नव्हते. तसेच, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतरदेखील ठेवण्यात आले नव्हते. यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.