Rajnath Singh| लखनऊमध्ये ‘कायस्थ परिवार अभिनंदन कार्यक्रम’ रविवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी त्यांनी देश आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने प्रगती करत असल्याची माहिती दिली.
“जागतिक नेत्यांची आणि लोकांची भारताबद्दल खूप सकारात्मक धारणा आहे. आजची परिस्थिती पूर्वीच्या दिवसांपेक्षा खूप वेगळी आहे. यापूर्वीच्या परदेश दौऱ्यांमध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सूचना दिल्या, तेव्हा लोकांनी त्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. पण, आता आम्ही काही बोललो तर अमेरिकेसारखा देशही आमचे ऐकतो आणि आमच्या सूचनांकडे लक्ष देतो,” असे म्हणत राजनाथ सिंह यांनी भारताच्या कमगिरीचे कौतुक केले.
पुढे ते म्हणाले की, “उत्तर प्रदेश किंवा उत्तर भारतात कोणीही कल्पना केली नसेल की येथे ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र निर्मिती युनिट तयार केले जाईल. पण, आज ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती स्थळावरील निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. या युनिटमुळे राज्यातील विविध लोकांसाठी नोकऱ्याही निर्माण होणार आहेत. आम्ही इतर देशांनाही ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची निर्यात सुरू केली आहे हे जाणून तुम्हाला आनंद होईल. फिलीपिन्सने आमच्याकडून क्षेपणास्त्रे मागितली आहेत. आता आपली क्षेपणास्त्रे परदेशात निर्यात केली जात आहेत. ” Rajnath Singh|
वाहतूक समस्येबाबत भाष्य Rajnath Singh|
पंतप्रधान मोदी रिंगरोड भेट देणार आहेत. वाहतूक समस्येबाबत सिंह म्हणाले की, “राज्यातील वाहतूक रोखण्यासाठी रिंगरोडचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. याआधी मी उत्तर प्रदेशात आलो होतो, तेव्हा रहदारीमुळे लोकांना खूप त्रास होत असल्याचं मी पाहिलं होतं. याला आळा घालण्यासाठी आम्ही लखनौमध्ये रिंग रोड बांधण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की या रिंगरोडचे बांधकामही पूर्ण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उद्घाटन करणार आहेत.
हेही वाचा:
सुप्रीम कोर्टात आज इलेक्टोरल बाँड प्रकरणी सुनावणी; SBIला मिळणार दिलासा की होणार निराशा?